हँडबॉल सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी हाताला बांधल्या काळ्यापट्ट्या   

मस्कत : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे. पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अशा परिस्थितीत आयपीएल स्पर्धाही रद्द करण्यात आली होती. पण त्याच वेळी, युद्धसदृश परिस्थितीत भारताला पाकिस्तानसोबत एक सामना खेळावा लागला. भारत आणि पाकिस्तानने  ओमानची राजधानी मस्कत येथे एकमेकांविरुद्ध हँडबॉल सामना खेळला. भारताने हा सामना १० व्या आशियाई बीच हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला. यावेळी भारतीय खेळाडूंनी काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरले, ज्यामुळे सर्वांचे मन जिंकले. पण आशियाई हँडबॉल फेडरेशन यांनी काळ्या पट्ट्या काढण्यास सांगितल्या.
 
हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक आनंदेश्वर पांडे म्हणाले, ’आंतरराष्ट्रीय हँडबॉल फेडरेशन नुसार, जर आम्ही सामन्यावर बहिष्कार घातला तर आम्हाला १०,००० चा दंड भरावा लागेल.’ आम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून दोन वर्षांची बंदी देखील लागू शकते. आयएचएफने आम्हाला स्पष्टपणे सांगितले की जर भारतीय संघ सामन्यासाठी आला नाही तर ते ऑलिंपिक चार्टरच्या भावनेविरुद्ध मानले जाईल. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
 
लीग सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या, परंतु चॅम्पियनशिप आयोजक आणि आशियाई हँडबॉल फेडरेशन यांनी त्यांना त्या काढण्यास सांगितले.अशा निषेधांसाठी त्यांच्या संघाला स्पर्धेतून काढून टाकले जाईल असे आयोजकांनी भारतीय प्रशिक्षकांना सांगितले.स्थानिक पातळीवर जनतेच्या रोषाच्या भीतीने भारतीय खेळाडूंनी सुरुवातीला सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार केला होता, परंतु आशियाई हँडबॉल फेडरेशनने त्यांना बंदी आणि मोठ्या दंडाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी सामना खेळण्याचा निर्णय घेतला. 

Related Articles