मणिपूरमध्ये चकमकीत दहा दहशतवादी ठार   

म्यानमार सीमेवर कारवाई 

इंफाळ : मणिपूरमध्ये सुरक्षा दलाबरोबर गुरुवारी सकाळी उडालेल्या चकमकीत दहा दहशतवादी ठार झाले आहेत. आसाम रायफल्सच्या जवानांच्या गोळीबारात दहशतवादी चंडेल जिल्ह्यात ते ठार झाले आहेत. भारत आणि म्यानमारच्या सीमेवर चंडेल जिल्हा आहे. राजधानी इंफाळपासून सुमारे १३० किलोमीटवर काल सकाळी चकमक उडाली, अशी माहिती कोहिमा येथील संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली. कारवाई अजूनही सुरू आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दहशतवादी जिल्ह्यात लपल्याचा सुगावा बुधवारी सुरक्षा दलाला लागला होता. त्यानंतर त्यांनी मोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 

Related Articles