भारत-पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध थांबवले   

ट्रम्प यांचा दावा 

वॉशिंग्टन : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांनी सीमापार हल्ले केले. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असतानाच मध्यस्थी करून संभाव्य अणुयुद्ध थांबवले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला.
 
पत्रकार परिषदेत बोलतान ट्रम्प म्हणाले, पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले; पण आमच्या प्रशासनाने मध्यस्थी करत संभाव्य अणुहल्ला टाळला. अन्यथा दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले असते. आम्हाला दोन्ही देशांसोबत व्यापार करायचा आहे, म्हणून आम्ही हा संघर्ष थांबवला. आमच्या प्रशासनाने १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील सामंजस्य करारात मध्यस्थी करण्यास सुरूवात केली. होती. भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष कायमस्वरूपी संपविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
 

Related Articles