नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे १३८ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला. ऑपरेशन सिंदूरमुळे देशातील २७ विमानतळे बंद करण्यात आली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई सुरू आहे व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ भारताने बुधवारी नष्ट केले होते. त्यामुळे विमानतळे आणि विमान उड्डाणे रद्द केली आहेत. आतापर्यंत एकूण ६६ देशांतगंत उड्डाणे आणि येणारी ६३ उड्डाणे रद्द केली. तसेच जाणारी पाच आणि येणारी ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली.
Fans
Followers