रिलायन्सचा ईशान्य भारतात ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्धार   

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ईशान्य भारतातील गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. सध्या या भागात कंपनीने सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ पुढील पाच वर्षांत रिलायन्स या राज्यांमध्ये सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक करणार आहे. ते दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘रायझिंग नॉर्थईस्ट इन्व्हेस्टर्स समिट’मध्ये बोलत होते.
 
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल आणि सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करत, अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशवासीयांचे अभिनंदन करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, प्रस्तावित गुंतवणुकीमुळे २५ लाखांहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या राज्यांमध्ये ३५० बायोगॅस प्रकल्प उभारण्याचीही कंपनीची योजना आहे. जिओ नेटवर्कविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, रिलायन्स जिओचे ५जी नेटवर्क ईशान्य भारतातील सुमारे ९० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचले आहे. सध्या ५० लाख लोक जिओ ५जी नेटवर्कशी जोडले गेले असून, ही संख्या यावर्षी १ कोटींपर्यंत जाईल.

Related Articles