तर वैष्णवीचा जीव वाचला नसता का?   

अंजली दमानिया यांचा महिला आयोगाला सवाल

मुंबई : वैष्णवी हगवणे हिची जाऊ मयूरी हिने तिला मारहाण झाल्याची, तसेच कपडे फाडल्याची तक्रार पुराव्यांसह महिला आयोगाला ईमेल करून केली होती. महिला आयोगाने यावर कारवाई का नाही केली? याचे उत्तर हवे आहे. वेळीच ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवीचा जीव वाचला नसता का? असा सवाल अंजली दमानिया यांनी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना केला आहे.
 
दमानिया यांनी मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी लिहिलेले पत्र समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मयुरी हगवणे हिला सासरच्या मंडळींकडून मारहाण झाल्याचे तसेच तिचे कपडे फाडल्याचे पुरावे मयुरीच्या आईकडून राज्य महिला आयोगाला देण्यात आले होते. आमचा मेहुणा मोठा पोलिस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे, अशी धमकी सासरच्या मंडळींकडून देण्यात येत असल्याचा उल्लेखही त्यामध्ये आहे. 

Related Articles