पंजाब सीमेवर ध्वज उतरविण्याच्या सोहळ्यासाठी नागरिकांना परवानगी   

अमृतसर : भारत आणि पाकिस्तनाच्या पंजाब सीमेवर तीन ठिकाणी आज (बुधवार)पासून ध्वज खाली उतरविण्याचा सोहळा पुन्हा सुरू होत असून तो सामान्य नागरिकांना खुला असेल, असे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सांगितले. पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर हा कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी स्थगित केला होता. . 
 
सैन्याच्या पंजाब फ्रंटियरच्या जालंधर मुख्यालयाने सांगितले की, मंगळवारपासून ध्वज उतरविण्याच्या सोहळ्याला सुरूवात केली. मात्र, तो प्रामुख्याने माध्यमांसाठी खुला होता. आज (बुधवार) पासून तो सर्वसामान्य  नागरिकांसाठी खुला केला जात आहे. सायंकाळी ६ वाजता तो होणार आहे. बीएसएफने सांगितले की, सोहळ्या दरम्यान भारतीय जवान पाकिस्तानी सैनिकांशी हस्तालोंदन करणार नाहीत. तसेच ध्वज खाली उतरवत असताना  वाघा आणि अटारी सीमेवरील दरवाजे उघडले जाणार नाहीत. दरम्यान सीमेवरील ध्वज खाली उतरविण्याची परंपरा बीएसएफने दररोज सुरू ठेवली होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर सोहळा स्थगित केला होता. तसेच नागरिकांना त्यात सहभागी होण्यास ८ मे पासून मनाई केली होती .

Related Articles