किराना टेकडीवर किरणोत्सर्ग नाही   

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडून स्पष्ट

 
वॉशिंग्टन : पाकिस्तानातील सरगोदा हवाई दलाच्या तळजवळ किराना टेकडीवर कोणत्याही प्रकारची अणु किरणोत्सर्ग झाला नसल्याचेे आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेने गुरुवारी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने आक्रमक कारवाई करुन सरगोदासह ९ हवाई दलाच्या तळावर हल्ले केले होते. सरगोदा तळावर  क्षेपणास्त्र डागले होते. त्यानंतर अणुबॉब साठ्यात किरणोत्सर्ग झाला असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता अर्थात तो भारताने फेटाळला होता. तसेच केवळ सरगोदा हवाई दलाच्या तळाला लक्ष्य केल्याचे म्हटले होते. तेथे अणु प्रकल्प होता की नाही, अणुबाँबचा साठा केला होता की नाही, याबाबत आम्हाला काहीच कल्पना नसल्याचे भारतीय लष्कराच्यावतीने सांगण्यात आले होते. आता काल आंतररराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने देखील किराना टेकडी परिसरात कोणताही किरणोत्सर्ग झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, विविध समाज माध्यमे आणि परदेशी माध्यमांनी भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरअणु किरणोत्सर्ग झाल्याचा दावा केला होता. तो दावा आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने देखील फेटाळला आहे. एअर मार्शल ए. के. भारती यांनी देखील काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, पाकिस्तानच्या अणुविषयक संस्थेवर आम्ही क्षेपणास्त्र डागले नव्हते. केवळ सरगोदा हवाई दलाच्या तळाला लक्ष्य केले होते. किराना येथे पाकिस्तानने अण्वस्त्रांचा साठा केला होता की नाही, याची आम्हाला कल्पना नसल्याचे ते म्हणाले होते. 

Related Articles