भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा   

चिनी दूतावासाचा आपल्या नागरिकांना इशारा

काठमांडू : नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना भारत-नेपाळ सीमेजवळ प्रवास टाळण्याचा इशारा दिला आहे. बेकायदा सीमा ओलांडणार्‍यांवर भारताने कारवाई सुरू केल्यानंतर चिनी दुतावासाने हा सल्ला दिला. 
 
जाणूनबुजून किंवा अनावधानाने सीमा ओलांडून भारतात बेकायदा प्रवेश केल्यास अटक होऊ शकेत. यासाठी २ ते ८ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो. जामिनाचा पर्याय नाही. नेपाळ आणि भारताचे नागरिक त्यांच्या ओळखपत्रांसह दोन्ही देशांच्या सीमा ओलांडू शकतात, परंतु हा नियम परदेशी नागरिकांना लागू होत नाही. परदेशी नागरिकांना नेपाळमार्गे भारतात प्रवेश करण्यासाठी व्हिसा आवश्यक असतो. त्यामुळे चिनी नागरिकांनी भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळावा, असे चिनी दुतावासाने म्हटले आहे 
 
दरम्यान, गुरुवारी बिहारमध्ये भारत-नेपाळ सीमेवर चित्रफीत बनवल्याबद्दल  दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात भारत आणि नेपाळने आंतरराष्ट्रीय सीमेवर संयुक्त गस्त घातली होती.
 

Related Articles