पंतप्रधान यांची 'मन की बात' आज रात्री आठ वाजता   

चर्चांना वेग 

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणाव सध्या निवळल्यासारखी स्थिती आहे. भारताने गेल्या आठवड्यात भयानक काळ बघितला. भारताच्या सीमा भागातील काही जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले. अर्थात त्यांचे ते सर्व हल्ले निष्फळ ठरले. भारताच्या सैन्यदल आणि वायुसेनेने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. 
 
दोन्ही देशांमध्ये सलग चार दिवस टोकाच्या तणावानंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या सर्व घडामोडींनंतर आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता 'मन की बात' द्वारेदेशातील नागरिकांना काही तरी सांगणार आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशाच्या जनतेला नेमके काय सांगणार ? याबाबत एक गूढ निर्माण झाले आहे. कारण मोदी यांनी यापूर्वी जेव्हा रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधला त्यावेळी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मग त्यामध्ये नोटाबंदीची घोषणा असेल किंवा लॉकडाऊनची घोषणा असेल. त्यामुळे त्यांच्या आजच्या 'मन की बात'ला एक विशेष महत्त्व आले आहे. 

Related Articles