केवळ व्याप्त काश्मीरवर चर्चा   

भारताला मध्यस्थाची गरज नाही...

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबतची होणारी चर्चा केवळ अणि केवळ व्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी होईल, आम्हाला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही,  असे पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक कारवाई गेली चार दिवस केली. त्यामुळे दोन्ही देशांत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले आणि प्रति हल्ले करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे एकूणच परिस्थिती मोठ्या युद्धाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले. याच दरम्यान, दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय जाहीर केला या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. तसेच चर्चेने प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. तेव्हा मोदी यांनी बजावले की, पाकिस्तानसोबत चर्चा केवळ आणि केवळ व्याप्त काश्मीर परत घेण्याबाबत होईल. तसेच ती द्विपक्षीय चर्चा असेल. त्यात कोणत्याही मध्यस्थातची गरज नाही.

उच्चस्तरीय बैठक 

शस्त्रसंधी झाल्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये संरक्षण खात्यासह सरकारी विभाग, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, तिन्ही दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर, हवाई  आणि नौदलाचे  प्रमुख बैठकीला उपस्थित होते. शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून सुमारे तीन तासांनंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते त्या पार्श्वभूमीवर योग्य ती पावले उचलण्याबाबत निर्णय घेण्यास अधिकार्‍यांना सांगण्यात आले होते. कोणताही हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हल्ला गंभीरपणे घेतला जाईल. 
 

Related Articles