पुन्हा कधीही पाकिस्तानात जाणार नाही : रिशाद हुसेन   

दुबई : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली. यापूर्वी दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र डागण्यात आली होती आणि भरपूर बॉम्बस्फोट झालेले, दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएल २०२५ पुढे ढकलण्याची घोषणा केली. त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये सहभागी झालेल्या सर्व परदेशी खेळाडूंना विमानाने पाकिस्तानहून दुबईला आणले गेले. 
 
दुबई विमानतळावर उतरल्यानंतर बांगलादेशी खेळाडू रिशाद हुसेन याने आपला थराराक अनुभव सांगितला. त्यासोबतच त्यानं आपल्या सहकारी क्रिकेटपटूंबाबतही सांगितलं. त्यानं सांगितलं की, त्याचा सहकारी क्रिकेटपटू नाहिद राणा कसा थरथरत होता, हेसुद्धा त्यानं सांगितलं. तसेच, त्यानं एका परदेशी खेळाडूबाबतही सांगितलं. त्यानं सांगितलं की, तो कधीही पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवणार नाही. 
 
क्रिकबझच्या मते, दुबई विमानतळावर उतरल्यानंतर, रिशाद हुसेननं पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, सॅम बिलिंग्ज, डॅरिल मिशेल, कुसल परेरा, डेव्हिड वीस आणि टॉम करनसह सर्व खेळाडू खूप घाबरले होते. दुबईत उतरल्यानंतर, डॅरिल मिशेलनं मला सांगितलं की, तो पुन्हा कधीही पाकिस्तानला जाणार नाही, विशेषतः अशा संकटाच्या काळात तर नाहीच नाही, मग काहीही होऊ देत. रिशाद हुसेनने असे सांगितले की, जेव्हा टॉम कर्रनला कळले की, पाकिस्तानातील विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यावेळी तो ढसाढसा रडू लागला. टॉम कर्रन लहान मुलासारखा रडू लागला आणि त्याला शांत करण्यासाठी दोघा-तिघांची गरज लागली. बांगलादेशचा खेळाडू रिशाद हुसेन म्हणाला की, दुबईत उतरल्यानंतर त्याला बातमी मिळाली की, त्याच्या विमानानं पाकिस्तान विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या २० मिनिटांतच विमानतळावर हल्ला झाला. मृत्यूपासून फक्त २० मिनिटांच्या अंतरावर असल्यानं, दुबईला आल्यानंतर आम्हा सर्वांना दुसरं जीवन मिळाल्यासारखं वाटले.
 

Related Articles