सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सुरक्षा सक्षम हवी   

-डॉ. शेंग लुंग पेंग

पिंपरी: पुणे शहर हे टेक्नॉलॉजीचे केंद्र बनले आहे  पुण्यामध्ये संगणकीय ज्ञान प्रगत असून सायबर सुरक्षेच्या नवनवीन कल्पनेचा  उदय होतो. सध्या सायबर गुन्हे वाढत चालले आहेत. ते रोखण्याकरता सायबर सुरक्षा  अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन तैवान मधील नॅशनल ताईपई युनिव्हर्सिटी ऑफ बिजनेसच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी अँड डिझाईनचे  संचालक डॉ. शेंग लुंग पेंग यांनी केले.डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातील, डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.    
 
या परिषदेसाठी विशेष निमंत्रित संगणक शास्त्रज्ञ आणि, टेकनॉ इंटरनॅशनल न्यू टाउन कोलकाताचे प्रा डॉ. नीलजन डे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहायक कन्सल्टंट स्मिता जाधव, पिंपरीच्या सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री सागर पोमन , डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम, शैक्षणिक संकुलाचे मुख्य वित्तीय अधिकारी  बी एच शर्मा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.   मालती, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ संदीप सरनोबत, परिषदेचे समन्वयक माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ लतिका देसाई, स्थापत्य अभियांत्रिकी चे विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे, तसेच परिषदेचे सहसमन्वयक डॉ. कल्याण बामणे, व डॉ. तपोब्रता डे उपस्थित होते.
 
आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचा वापर खूप होत आहे. याचा उपयोग करून मोठमोठे स्टार्टअप  सुरू होत आहेत, यातूनच देशाची प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन डॉ. नीलांजन डे यांनी केले.पिंपरीच्या सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत चालले आहे ते रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती  आवश्यक आहे  सायबर सिक्युरिटीचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे , असे नमूद केले.डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल अमित विक्रम यांनी आजच्या बदलत्या परिस्थितीत मानवाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे त्यासाठी विद्यार्थी दशेतच संशोधनाची बीजे रोवली पाहिजेत, असे मत  व्यक्त केले.
 
स्मिता जाधव यांनी सांगितले  की, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटीचे महत्व वाढले आहे.प्राचार्या डॉ पी मालती यांनी  महाविद्यालयाची माहिती दिली  परिषदेच्या समन्वयक डॉ. लतिका देसाई व डॉ. अशोक मोरे यांनी परिषदेची विस्तृत माहिती दिली एकूण  १७६ शोधनिबंध या परिषदेसाठी प्राप्त झाले असून त्यातील १४५ पेपर ची निवड केली आहे. एकूण ७ सत्रांमध्ये हे पेपर सादर केले जाणार आहेत. 
 
भारताच्या विविध राज्यातून विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक, तसेच भारताबाहेरील विविध रिसर्च स्कॉलर्स आपले संशोधन या परिषदे मध्ये सादर होत आहेत.
सूत्रसंचालन आराधना चव्हाण, डॉ. सुहास पाटील यांनी केले.  डॉ. बामणे आणि डॉ. तपोब्रता डे यांनी आभार प्रदर्शन केले.परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी, डी वाय पाटील आकुर्डी संकुलाचे चेअरमन  सतेज पाटील, डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त  तेजस पाटील, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त), महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  पी. मालती, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत यांचे  मार्गदर्शन लाभले.

Related Articles