‘पाकिस्तान दहशतवादासाठी पैशाचा वापर करतो   

आयएमएफने दिलेल्या मदतीवर भारताकडून चिंता व्यक्त 

वॉशिंग्टन : सीमेवर सुरू असलेल्या तणावा दरम्यान, भारत-पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानसाठी प्रस्तावित केलेल्या १.३ अब्ज डॉलर्सच्या बेलआउट मदतीवर भारताने चिंता व्यक्त केली. भारताने म्हटले आहे, की पाकिस्तानचा मागील इतिहास खराब आहे. ते या निधीचा वापर दहशतवादासाठी करत असण्याची शक्यता आहे.
 
भारत सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे, की आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वितरीत केलेल्या निधी सुविधा कर्ज कार्यक्रमाचा (१ अब्ज) आढावा घेतला आणि पाकिस्तानसाठी नवीन स्थिरता सुविधा कर्ज कार्यक्रमावर (१.३ अब्ज) देखील विचार केला. एक जबाबदार सदस्य देश म्हणून, भारताने पाकिस्तानच्या बाबतीत आयएमएफ कार्यक्रमांच्या प्रभावीतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा मागील इतिहास आणि राज्य-प्रायोजित सीमापार दहशतवादासाठी कर्जाच्या निधीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, असे भारताने सांगितले.

दहशतवाद्यांना निधी 

पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे लष्करी गुप्तचर कारवाया आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देते. या दहशतवादी गटांनी भारतावर हल्ला करण्याचा कट रचला आहे, असे भारताकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. 
 

Related Articles