पाकिस्तानकडून सामान्य नागरिक लक्ष्य   

१६ जणांनी गमावले प्राण; ५९ जखमी

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य बनविले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात आतापर्यंत १६ निष्पापांना प्राण गमवावे लागले. पूंछ परिसरात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, ५९ जण जखमी झाले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. जखमींपैकी ४४ जण पूंछचे आहेत, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर पाकिस्तानकडून तोफांचा मारा आणि गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराकडून यास जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles