पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट करण्याची गरज : गनबोटे   

पुणे : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही काहीही कारवाई झालेली नव्हती. परंतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची स्थळे उद्ध्वस्त केली. याबाबत मोदींचे कौतुक करण्यासारखे आहे. मात्र, यापुढे पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट केला पाहिजे. मोदी यांनी हे करतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया कौस्तुब गनबोटे यांच्या पत्नी संगीता गनबोटे यांनी दिली. 
 
गनबोटे म्हणाल्या, हल्ला झाल्यापासून सरकार कुठलीच पाऊले का उचलत नाहीत, असे नेहमी वाटत होते. या घटनेला पंधरा दिवसांचा कालावधीत उलटून गेला होता. आता ’ऑपरेशन शिंदूर’ राबवत दहशतवाद्यांचा सरकारने खात्मा केला आहे. ’ऑपरेशन सिंदूर’ हे दिलेले नाव देखील योग्य आहे. यामधून आपल्या देशाकडे वाकडया नजरेने पाहण्याची हिमत पाकिस्तानला होणार नाही, हा थेट संदेश जात आहे. पर्यटकांवर हल्ला करताना दहशतवाद्यांनी थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतले होते. या हल्ल्याची माहिती पंतप्रधानांना सांगा. आम्ही महिलांवर हल्ला करीत नाही, असे दहशतवाद्यांनी धमकावून सांगितले होते. आता ’ऑपरेशन सिंदूर’ राबवत मोदींनी हल्ल्याचा चांगलाच बदला घेतला आहे, असेही संगीता गनबोटे म्हणाल्या. माझा मुलगा कुणाल हा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना भेटला होता. त्यावेळी नड्डांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. ते आता पूणर झाले आहे, असे त्या म्हणाल्या.  
 

Related Articles