बीडमधील सहाशे पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या   

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिस प्रशासनावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास राहिला नव्हता. या प्रकरणातील आरोपींना मदत केल्याप्रकरणी काही पोलिसांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही संबंधित काही पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाव्यात, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता बीड पोलिस दलातील शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक अशा ६०६ अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी हा निर्णय घेतला.  
 
बीड जिल्ह्यामधील बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था, तसेच  दिवसाढवळ्या अपहरण, दरोडा, मारहाण या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. 
त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे ज्या भागात पोलिस कर्मचारी वास्तव्यास आहे, त्या भागातील पोलिस कर्मचार्‍यांची बदली दुसर्‍या तालुक्यात करण्यात आली आहे. यामुळे कुठल्याही पद्धतीने किंवा चुकीचे काम होणार नाही, याची खबरदारी अधीक्षक नवनीत कावंत यांनी घेतली आहे.

Related Articles