पाकिस्तानची अण्वस्त्रे सुरक्षित हातात आहे का   

राजनाथ सिंह यांचा सवाल, निरीक्षणाची मागणी

श्रीनगर : पाकिस्तानची अण्वस्त्रे सुरक्षित हातात आहेत का ? असा प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी उपस्थित केला आहे. तसेच अण्वस्त्रांचे आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेकडून केले जावे, अशी मागणी केली आहे. 
 
ऑपरेशन सिंदूर नंतर राजनाथ सिंह प्रथमच जम्मू आणि काश्मीरच्या दौर्‍यावर काल आले.. त्यांनी काल लष्कराच्या बदामी बाग तळाला भेट दिली. तसेच जवानांची भेट घेऊन  त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी सिंह यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा विषय गंभीरपणे मांडला आहे. ते म्हणाले, भारताने  सैन्य कारवाई करुन पाकिस्तानला मोठा धडा शिकविला आहे. अण्वस्त्र हल्ला करु अशी धमकीला भारताने भीक घातली नाही पाकिस्तान हा . बेजबाबदार आणि दुष्ट देश असून तो आंतरराष्ट्रीय भिकारी आहे. पाकिस्तान जेथे उभा राहतो तेथूनच भीक मागण्यास सुरुवात होते, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले. दहशतवादाविरोधघत भारताने केलेली सर्वात मोठी कारवाई होती. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून भारत दहशतवादाचा सामना करत आला आहे. तसा सामना जगातील कोणत्याही देशाने आतापर्यंत केलेला नाही, पहलगाम हल्ल्याने दहशतवादाचा कळस गाठला होता. त्यामुळे त्याला चोख प्रत्तुत्तर देणे भाग पडले.  कारण हा केवळ दहशतवादी हल्ला नव्हे तर, देशाच्या सामाजिक ऐक्यावर केलेला प्रहार होता भविष्यात पाकिस्तानने आणि दहशवाद्यांनी कुरापत काढू नये ,भारताकडे वाकड्या नजरेने पुन्हा पाहू नये, यासाठी प्रचंड कारवाई भारताला करावी लागली असल्याचे ते म्हणाले.
 

Related Articles