‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात पाकिस्तानने राबवले ‘बुनयान उल मरसूस’   

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात बुनयान उल मरसूस’ हे ऑपरेशन राबवले आहे. काय आहे हे ऑपरेशन? 
 
बुनयान उल मरसूसचा अर्थ काय?
    
हा एक अरबी शब्द असून, तो कुराणमधून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ लोखंड किंवा मजबूत काचेची भिंत असा होतो. ऑपरेशन सिंदूरनंतरच्या भारत-पाकिस्तान तणावात भारतीय लढाऊ विमाने आणि ड्रोन पाकिस्तानमध्ये घुसून  हल्ले करत आहे. त्यावरून पाकिस्तानची मजबूत भिंत किती कमकुवत आहे, हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे.
 
फतेह-१ क्षेपणास्त्र पाडले
 
दिल्लीला लक्ष्य करून पाकिस्तानने शुक्रवारी फतेह-१ क्षेपणास्त्र डागले. मात्र, भारतीय लष्कराने हवेतच ते नष्ट करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. व्याप्त काश्मीरमधून ड्रोन हल्ले करण्यात येत होते. तेथील दहशतवादी तळ आणि लाँच पॅड भारतीय लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात नष्ट झाले.
 
पाकिस्तानला अन्नाची भ्रांत 
 
पाकिस्तानचा दररोजचा कच्च्या तेलाचा वापर ०.२५ दशलक्ष बॅरल आहे. त्यात फक्त २२ दिवसांचा आपत्कालीन राखीव साठा आहे. गव्हाचा फक्त ३२३ दिवसांचा साठा आहे. तांदळाचा साठा केवळ ४८७ दिवसांसाठी आहे. मक्याचे उत्पादन ९६ लाख टन आहे. त्याचा वापर ९१ लाख टन आहे. फक्त ४८० दिवसांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय संस्थांकडे भीक मागत आहे. युद्ध झाल्यास पाकिस्तानला अन्नाची भ्रांत पडेल.  
 
नवाज शरीफ इंग्लंडमधून परतले
  
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला असून, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले. भारतापुढे पाकिस्तान आता गर्भगळीत झाला आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये उपचार घेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे उपचार अर्धवट सोडून पाकिस्तानमध्ये दाखल झाले. त्यांनी पाकिस्तानला विनाकारण आक्रमक होऊ नका, शांत राहा, असा सल्ला दिला आहे.

Related Articles