संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई   

प्रयागराज : देश जेव्हा जेव्हा संकटात सापडला तेव्हा राज्यघटनेने देशाचे ऐक्य ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, तसेच देशाला तारले आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी सांगितले. 
 
अलाहाबाद उच्च न्यायलयातील वकिलांच्या चेंबरचे आणि बहुमजली वाहन तळाचे उद्घाटन गवई यांच्या हस्ते काल झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यघटनेचा अंतिम मसुदा जेव्हा घटना सभेकडे सादर केला. तेव्हा काही जणांनी राज्यघटना खूपच संघराज्य असून ती एककल्ली असल्याचे म्हटले होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दोन्ही बाबी फेटाळून लावल्या होत्या. माझ्या मते शांतता आणि युद्धाच्या काळात  देशाला एकत्र बांधून ठेवणारी राज्यघटना आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने विकासचा मार्ग दाखवला. भारताशेजारी देशांची अवस्था काय आहे ? हे आपण पाहतच आहोत. या उलट भारत विकासाच्या प्रवासात अग्रेसर आहे. संकट काळात राज्यघटनेने देशाला तारले आणि ऐक्य अबाधित ठेवण्यात मोलाची भर घातली. देशाच्या ७५ वर्षांच्या प्रवासात राज्यघटनेेची प्रभावी अंमलजावणी झाली. सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यात कार्यकारी आणि न्यायपालिकेने खूप योगदान दिले आहे. 

Related Articles