E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
29 May 2025
चतुर राजा
खूप पूर्वीची गोष्ट आहे. एक राजा दुसर्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या कब्जामध्ये घेतो. युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोषात एका पत्र्याच्या पेटीत ठेवतो. युद्धामध्ये हरलेला राजा गंभीर जखमी होतो आणि त्याचा राजकुमार आपला जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून जातो. कारण त्या राजपुत्राला ओळखणं कठीण होतं, तो पायाने लंगडत असल्याने लोक त्याला ओळखत नाहीत.
दुसर्या दिवशी, राजाच्या दरबारात एक तेजस्वी संन्यासी येतो. राजा त्याच्या तेजाने प्रभावित होतो आणि त्याचा पाहुणचार राजशाही थाटात करतो. परंतु तो संन्यासी प्रत्यक्षात राजकुमारच असतो. संधी साधून, तो रात्रीच्या अंधारात राजकोषातून आपली वडिलोपार्जित संपत्ती घेऊन फरार होतो. जेव्हा दुसर्या दिवशी खजिन्याची चोरी उघडकीस येते, तेव्हा राजा खूप दुःखी होतो.तेव्हा त्याचा प्रधान त्याला सांगतो, ‘महाराज, आपण दुःखी का होत आहात? जी संपत्ती आपली नव्हतीच, तिला गमावल्यामुळे दुःख करणे व्यर्थ आहे.’ हे ऐकून राजाला सत्याची जाणीव होते आणि तो आपल्या दुःखातून बाहेर येतो.
तात्पर्य : करावे तसे भरावे.
---------
परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या असतात, बाकी गैरसमज आहे
जेवताना शेतकर्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरू नये
कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरू नका परमेश्वर नेहमी ऑनलाईन असतो
सॉरी माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो
नातं हृदयातून असावं. रक्ताची नाती हल्ली वृद्धाश्रमात सापडतात
लाकडाच्या ओडक्यांनी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते- झाडे लावा झाडे जगवा
नाती जिवंतपणीच सांभाळा, ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही!
नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधी सांगणे अवघड असते
चमचा ज्या भांड्यात असतो त्यालाच तो रिकामा करतो. चमच्यापासून सावध रहा
उपवास नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा
भावना ही जगातील सर्वात धोकादायकनदी आहे ह्यात सगळे वाहून जातात
मूर्खाशी कधीच वाद घालू नये. त्याची संख्या १ ने वाढते
--------
सगळेच विषय सांभाळणारी वही ‘रफ’ म्हणून ओळखली जाते, तिला ना सुंदर बाइडिंग असते, ना सुंदर कव्हर...
कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची पण अशीच अवस्था असते.
--------
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका..
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ
आणून दिली त्याचे मोल कधी विसरू नका..
--------
ती गेली... ती गेली... सकलसौभाग्यवती होऊन... घरातलं मापट ओलांडून तिची सप्तपदी घरात प्रवेशली खरी...; पण आल्या पाऊली ती रक्ताळलेल्या पावलांनी माघारी वळली... जड अंतःकरणाने आपल्या इवल्याश्या जिवाला मागे ठेवून ती गेली.....ती गेली....नरकरुपी घरातून... भरल्या कपाळानं, सावकाशपणे ज्या घरात लग्नात माप ओलांडून कुंकवाची शुभलक्षणी पावलं तिनं उमटवली होती, त्या पाऊलखुणा पुसत पुसत ती गेली... ती गेली...पैशाच्या मोहापायी सैतानाने घरच्या गृहलक्ष्मीचाच घात केला.
कस्पटे-हगवणे ना आपले नातेवाईक ना मित्रमंडळींपैकी; पण एकूणच हा संपूर्ण घटनाक्रम जर एका मुलीच्या बापाच्या नजरेतून पाहिला तर डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.
सोनं-चांदी, पैसा-अडका, फॉर्चूनर, जागा-जमिनी यापुढे स्त्रीधनाला काहीच किंमत नाही का?
यापुढे तरी आपण राहतो त्या समाजात ही अशी पाशवी कृत्यं थांबायला हवी अशी एक मुलीचा बाप म्हणून राज्यकर्त्यांकडे कळकळीची मागणी.
- अमित पापळ(व्हॉट्स अॅपवरुन साभार)
--------
जीवनात आपल्याला दुसर्यांना दिलेला त्रास एक दिवस आपल्यालाही परत मिळू शकतो. त्यामुळेच, आपल्याला नेहमीच चांगलं वागावं लागेल आणि दुसर्यांच्या भावनांचा आदर करावा लागेल. जेव्हा आपण कोणालाही दु:ख देतो, त्याच्या मनावर, भावना आणि जीवनावर परिणाम होतो आणि हे लक्षात ठेवूनच आपल्याला कधीही दुसर्यांना त्रास देण्यापूर्वी विचार करावा लागतो.
जेव्हा आपण चांगल्या वागणुकीचा मार्ग अवलंबतो, तेव्हा आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वळणावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो. दुसर्यांना दुखावून काही मिळवणं अस्थायी असू शकतं; पण चांगल्या वागणुकीच्या आणि विचारांच्या फळांनी दीर्घकालीन सुख आणि शांती मिळते.
सर्वांनी चांगले वागून, एकमेकांची कदर करून आणि सहानुभूतीने वागून आपला समाज आणि नातेसंबंध अधिक दृढ आणि सुंदर बनवू शकतात.
---------
पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण
आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय?
----------
Related
Articles
पोलिसांच्या सिग्नल फ्री, यु-टर्न संकल्पनेला नागरिकांचा विरोध
23 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
डॉ. सबनीस यांच्या वैचारिक भूमिकेचा महाराष्ट्र ऋणी
23 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
युद्ध करून भारताच्या सहा नद्या मिळवू : बिलावल
23 Jun 2025
अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
22 Jun 2025
पोलिसांच्या सिग्नल फ्री, यु-टर्न संकल्पनेला नागरिकांचा विरोध
23 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
डॉ. सबनीस यांच्या वैचारिक भूमिकेचा महाराष्ट्र ऋणी
23 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
युद्ध करून भारताच्या सहा नद्या मिळवू : बिलावल
23 Jun 2025
अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
22 Jun 2025
पोलिसांच्या सिग्नल फ्री, यु-टर्न संकल्पनेला नागरिकांचा विरोध
23 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
डॉ. सबनीस यांच्या वैचारिक भूमिकेचा महाराष्ट्र ऋणी
23 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
युद्ध करून भारताच्या सहा नद्या मिळवू : बिलावल
23 Jun 2025
अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
22 Jun 2025
पोलिसांच्या सिग्नल फ्री, यु-टर्न संकल्पनेला नागरिकांचा विरोध
23 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
डॉ. सबनीस यांच्या वैचारिक भूमिकेचा महाराष्ट्र ऋणी
23 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
युद्ध करून भारताच्या सहा नद्या मिळवू : बिलावल
23 Jun 2025
अग्निशमन दल भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
22 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
2
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
3
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
4
मुंबई, कोकणात मुसळधार
5
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
6
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला