काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा   

श्रीनगर : काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे आणि त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. मुफ्ती यांनी जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यावेळी काश्मीरी पंडीतांच्या मुद्द्यावर अर्थपूर्ण प्रगतीसाठी आराखडा त्यांनी सादर केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही प्रस्तावाच्या प्रती त्यांनी सादर केल्या. त्यांच्या प्रस्तावात, विस्थापित काश्मिरी पंडित कुटुंबाला त्यांच्या मूळ जिल्ह्यात जमीन वाटप करावी, जी त्यांच्या परत येण्याच्या इच्छेवर अवलंबून असेल. ज्या कुटुंबांची मूळ घरे अजूनही अस्तित्वात आहेत; परंतु जीर्ण किंवा नुकसान झालेल्या स्थितीत आहेत, त्यांना दुरुस्तीसाठी मदत द्यावी, असे त्यात म्हटले आहे. 

Related Articles