बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा   

आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेवर अपघाती मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा हा खर्च मुंबई लोकलच्या सुधारणांवर करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केली.मुंबईत रेल्वे अपघातात गेल्या ११ वर्षांत २९, ९७० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० हजार २१४ जखमी झाले आहेत. तर धावत्या लोकलमधून ६ हजार ७६० प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. याकडे लक्ष वेधताना आदित्य यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली. 

Related Articles