पुणे : मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर तालुक्यातील खडकी व वाळकी गावांमध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील रहिवासी पुराच्या पाण्यात अडकून पडल्याने लष्कराने विशेष मोहिम राबवून काहीजणांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून यामध्ये खडकी येथील दहा तर वाळकी गावातील २५ पुरग्रस्तांचा समावेश आहे. खडकी व वाळकी ही दोन्ही गावे सैन्याच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूलपासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय लष्कराने तात्काळ ॒एसीसी अॅन्ड एस येथून मदत पथक तैनात केले. या दोन्ही गावांमध्ये लष्कराच्या जवानांकडून रात्री उशीरापर्यंत बचाव व मदत कार्य सुरू होते.
Fans
Followers