व्हॉट्सऍप कट्टा   

एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्से करुन वाटून घेत. आपापला हिस्सा स्वत:साठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवतात. असे खूप दिवस चालत होते. एका रात्री ते चोरीसाठी दुसर्‍या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही. ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्यांनी संताला उठवले व म्हणाले की काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.
संताने त्यांना विचारले तर त्या चोरांनी सांगितले की आम्ही चोर आहोत. आम्ही चोरी करतो. हे ऐकून संत म्हणाले, तुम्ही करता ते चांगले आहे की वाईट याचा कधी विचार केला?
चोर म्हणाले, आम्ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्ही तीन हिश्श्यांमध्ये वाटतो. एक एक भाग आम्ही घेतो आणि तिसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडा देऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही; पण आता चोरापुढे प्रश्न पडला की आता याचे हिस्से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्चर्यचकित झाले. संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले की चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे. हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्कार करून चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.
--------
पती : मला घटस्फोट हवाय. बायको सतत मला भांडी फेकून मारते...
न्यायाधीश : हा प्रकार कधीपासून सुरू आहे...
पती : दोन वर्षे झाली...
न्यायाधीश : मग घटस्फोटासाठी आता का आलात...?
पती : कारण, आता तिचा निशाणा अगदी बरोबर लागतोय...
---------
लग्न कधी कसे जमणार? विचार करा
 
ं कमी शिक्षण आहे : नको
ं पगार कमी आहे : नको
ं खेड्यात राहतो : नको
ं स्वतःचे घर नाही : नको 
ं घरात सासू सासरे आहेत : नको
ं शेत नाही : नको 
ं शेती करतो : नको
ं धंदा करतो : नको
ं फार लांब राहतो : नको
ं काळा आहे : नको
ं टक्कल आहे : नको
ं बुटका आहे : नको
ं फार उंच आहे : नको
ं चष्मा आहे : नको
ं वयात जास्त अंतर आहे : नको
ं तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही : नको
ं एक नाडी आहे : नको
ं मंगळ आहे : नको
ं नक्षत्र दोष आहे : नको
ं मैत्रीदोष आहे : नको
सगळ्यालाच नकार देत राहिलात तर मग लग्न कधी करणार?
ं संसार कुणाबरोबर करणार?
ं आई-वडील कधी होणार?
ं सासू-सासरे कधी होणार?
ं आजी-आजोबा कधी होणार?
 
बरं एवढ्या सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देणार्‍या मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट्ये असतात हे आईवडील सांगू शकतील काय? अनेक मुलींना तडजोड कशी करायची हे माहीत नसतं, रोजचं जेवणसुद्धा बनवता येत नाही. काही मुलींना... मान्य आहे मुली हुशार आहेत, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार ? त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो; पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाइकांच्या वेलसेटलच्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात.
 
मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे, तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला; पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे. भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो.
---------

Related Articles