आसखेड धरणात पंधरा टक्के पाणीसाठा!   

चाकण,(वार्ताहर) : चार तालुक्यासह पुणे व पिंपरी चिंचवड पालिकेसाठी महत्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५ .० ९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाबआहे.यावर्षीउन्हाळीव या हंगामातीलदुसरे आवर्तन १० एप्रिल २५ रोजी सुरु करण्यात आले. त्यासाठी १ हजार २०० क्यूसेक प्रति सेकंद वेगानेनदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे,अशी माहिती धरण प्रशासनाचे निलेश घारे यांनी दिली. 
 
उन्हाळी व पाहिले आवर्तन ३ मार्च ते १३ मार्च २५ रोजी दरम्यान सोडण्यात आले होते. त्यावेळी शिरूर तालुक्यातीलआलेगावपागा पर्यन्त सुमारे १८ बंधारे भरले होते,अशी माहितीही त्यांनी दिली. तर दुसरे आवर्तन तब्बल ३३ दिवस१२०० क्यूसेक्सने सोडण्यात आले होते. पाण्यामुळे खेड तालुक्यातील १०, शिरूर मधील ४ ,हवेली मधील ४ तर दौंडमधील ६ बंधारे असे एकूण २४ बंधारे भरण्यात आले. परंतु त्यानंतर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टक्के पाणीसाठा कमी राहिला. 
 
गेल्या दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने कित्येक बंधार्‍यातील पाणी किमान ७ ते८ दिवस वापरले जाणार नाही त्यामुळे १५ जून पर्यन्त पावसाने दडी मारली तरी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा अंदाज धरण प्रशासनाचे निलेश घारे यांनी व्यक्त केलाआहे. यंदा एकूण १२९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.भामाआसखेड हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे धरणआहे. उपयुक्त साठा ३२.७६६ दलघमी (१.१६ टीएमसी) आहे.धरणात एकूण पाणीसाठा ४२.२८८ दशलक्ष घन मीटर(१.६३ टीएमसी) इतका असून धरणसाठा१५.०९ टक्केआहे तर गतवर्षी २०.१५ इतका होता. 
 
भामाआसखेड हे मातीचे धरण असून ते खेड, शिरूर, दौंडतालुक्यासह हवेली तालुक्याचा काहिभागातील शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी चिंचवड साठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे.यावर्षी ३३ दिवस सोडण्यात आलेल्या आवर्तनपाण्यामुळे २४ बंधारे भरले त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असून ही सुमारे महिनाभर पिण्याच्या पाणी योजनेस अडचण येणार नाही. 
 

Related Articles