भारतीय लष्कराचा अपप्रचार;चीनच्या ग्लोबल टाइम्सवर बंदी   

भारत सरकारचा निर्णय, एक्स हॅडलला कुलूप

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा अपप्रचार करणार्‍या चीनला भारताने बुधवारी दणका दिला. त्या अंतर्गत चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्स आणि झिन्हुआ वृत्तसंस्थेच्या एक्स हँडलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. नंतर ऑपरेशन सिंदूर कारवाई भारताने राबविली होती. याच कालावधीत भारतीय लष्कराविरोधात खोट्या आणि अपप्रचार करणार्‍या बातम्या ग्लोबल टाइम्सने एक्स हॅडलने प्रसारीत केल्या होत्या. भारतीय दूतावसाने सत्यता तपासून त्या प्रसारीत कराव्यात, असे मंगळवारी बजावले होते.  प्रिय ग्लोबल टाइम्स न्यूजने आपल्या सूत्रांकडून येणार्‍या माहितीची उलट तपासणी करावी, सत्य पडताळून पाहावे आणि त्यानंतर ते प्रसारीत करावे. खोटी माहिती प्रसारीत करु नये, असेे दूतावासाने एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये नमूद केले होते. ऑपरेशन सिंदूर कारवाईवेळी भारताने दहशतवादी तळ आणि दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते. मात्र, ग्लोबल टाइम्सने भारताने जणू पाकिस्तानवर हल्ला केला असल्याचे रकाने भरले होते. पोस्टमध्ये असेही दूतावसाने म्हटले आहे की, अनेक पाकिस्तान पुरस्कृत हॅडलरनी ऑपरेशन सिंदूरबाबत बिनबुडाचे दावे केले होते. त्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल केली. चिनी माध्यमांनी या माहितीची सत्यता तपासल्याशिवाय वृत्ते प्रसाीत केली आहेत. या सर्व बाबी पत्रकारितेच्या मूल्याविरोधात आहेत. 

ते राफेलचे नव्हे तर मिग २१ चे जुने छायाचित्र 

या संदर्भात उदाहरण देताना दूतावसाने स्पष्ट केले की, भारताचे लढाऊ विमान राफेल बवाहलपूर येथे पाडण्यात आल्याची खोटी माहिती पाकिस्तानी समाज माध्यम खात्यावर फिरत हेती. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉरमेशन ब्युरोच्या (पीआयबी) सत्यशोधन पथकाच्या छाननीत दिसून आले की, जे राफेल पाडल्याचे छायाचित्र दाखवले होते ते प्रत्यक्षरित्या पंजाबच्या मोगा जिल्ह्यात २०२१ मध्ये कोसळलेल्या मिग २१ लढाऊ विमानचे होते. अर्थात ते जुने छायाचित्र दाखवून ते राफेलचे असल्याचे भासवले गेले होते. पाकिस्तान पुरस्कृत हॅडलच्या अशा जुन्या छायाचित्रापासून सावध राहावे, अशा इशारा पीआयबीच्या पोस्टमध्ये देखिल दिला होता. 
 
दरम्यान, भारतीय सैन्याने ६ आणि ७ मे रोजी व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात आक्रमक कारवाई केली. तेव्हा देखील तर्कियेच्या टीआरटी वर्ल्ड एक्स हँडलवर देखील खोटी माहिती प्रसारीत केली होती. त्याचाही समाचार भारतीय दूतावसाने घेतला आहे. तसेच त्यावर कोरडे ओढले आहेत. 

अरुणाल प्रदेश भारताचा चीनला खडसावले

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहणार आहे, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने  चीनला खडसावले आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांची नावे बदलली असून चीनी भाषेत त्यांचे नामकरण केले आहे. या बाबीला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.  चीनने कल्पकतेने राज्याच्या भागांचे नामकरण केले आहे. मात्र, अशी नावे बदलण्याच्या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. भागांचे नामकरण करुन वस्तुस्थिती बदलणार नाही. कारण अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असून तो राहणार आहे. हा सर्व प्रकार चीनचा निव्वळ खोडसाळपणा आहे. आम्ही चीनचे असे प्रयत्न हाणून पाडणार आहोत. 

Related Articles