ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला   

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध रोखले,  अणुयुद्ध झाले असते तर लाखो नागरिकांचे प्राण गेले असते. शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तो भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी फेटाळला आहे. 
 
भारताची कारवाई केवळ लष्करी स्वरुपाची होती, असेही म्हटले आहे.  भारताने पाकिस्तानविरोधात केलेली कारवाई पारंपरिक लष्करी होती. १० मे रोजी पाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाची बैठक घेतली जाणार असल्याचे वृत्त होते. मात्र, पाकिस्तानच्या पराराष्ट्र मंत्र्यांनीच तशी बैठक झाली नसल्याचे सांगितले होते, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी काल स्पष्ट केले. 
 
भारतानेच शस्त्रसंधी केली आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा काही एक सहभाग नव्हता. भारताने केवळ केवळ लष्करी कारवाई केली. त्यात अणुयुद्धाचा प्रश्न येतोच कुठे ? अशा आशयाचे  मत देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केले.
 

Related Articles