शस्त्रसंधीचे उल्लंघन; २० दहशतवादी ठार   

नवी दिल्ली : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर सीमेवर आक्रमक कारवाई करत सुमारे १५ ते २० दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती लष्कराने दिली. या संदर्भात मंगळवारी पत्रकार परिषद झाली.
 
शनिवारी शस्त्रसंधी दोन्ही देशांनी मान्य केली होती. तत्पूर्वी दोन्ही देशांच्या लष्करी कारवाई महासंचालकांनी फोनवरुन चर्चा केली होती. शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर अवघ्या चार तासांत पाकिस्तानकडून आगळीक करणत आली. शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आले होते. तेव्हा सडेतोड उत्तर देण्याचे आदेश जवानांना दिले होते. याच दरम्यान, पाकिस्तानी हद्दीतून ड्रोन पाठवण्यात येत होते. त्यामुळे पुन्हा एकमेकांवर हल्ले होणार की काय? अशी चिंता परिसरातील नागरिकांना पडली होती.  या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जोरदार कारवाई केली. 
 
पाकिस्तानी अनेक चौक्या नष्ट केल्या. या कारवाईत १५ ते २० दहशतवाद्यांना ठार केल्याचे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले. अर्थात जशी रात्र वाढली तशी सीमेपलीकडून आगळीक कमी झाली. ड्रोनची संख्या रोडावली, गोळीबार कमी झाला. नंतर सीमावर्ती भागांत शांतता पसरली आहे. 

समिती स्थापन करणार का? काँग्रेसचा सवाल

कारगिल युद्धानंतर ज्या प्रमाणे आढावा घेणारी समिती माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात स्थापन केली होती. त्याप्रमाणे आता पहलाग दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरनंतर स्थापन करणार का ?, असा प्रश्न काँग्रेसने सरकारला केला आहे.

थरुर यांच्या नेतृत्वाखाली संसदीय समितीकडून माहिती

पाकिस्तानसोबच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या स्थायी समितीकडून १९ मे रोजी दिली जाईल असे परराष्ट्र सचिव विवेक मिस्त्री यांनी मंगळवारी सांगितले. 
 

Related Articles