अखंड भारताची संधी सरकारने सोडली   

ठाकरे गटाची टीका 

मुंबई :  स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. पाकिस्तानने कुरापत काढून तशी संधी दिली होती. मात्र, केंद्रातील भाजपने सरकारने शस्त्रसंधी करुन ती सोडली, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. सामना वृत्तपत्रात याबाबतची टीका केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आणि दहशतवाद्यांविरोधात सैन्य कारवाई भारताने केली. आक्रमक कारवाई करुन पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. मात्र, अचानक शस्त्रबंदी करुन अखंड भारताचे सावरकर यांनी पहिलेले स्वप्न भंग झाले. कारवाई सुरू ठेवत ते पूर्ण करण्याची संधी गमावली, अशी टीका सरकारवर करण्यात आली आहे.

Related Articles