एलओसीवर १५-२० दहशदवाद्यांचा खात्मा : परराष्ट्र मंत्रालय   

नवी दिल्ली : ओप्रेशन सिंदूर सुरु झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच होता. १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. तसेच पाकिस्तानने आगळीक केल्यास जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशारा आता भारताने दिलेला आहे.या सर्व घडामोडींवर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाला संबोधित करत पाकिस्तानला कडक इशारा दिला.भारत कोणत्याही धमकीला आता घाबरणार नाही, दहशदवादाला जश्यासतसे उत्तर दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. 
 
पाकिस्तान अनेक वर्ष दहशदवादाला खतपाणी घालत आहे परंतु आता भारत हे सहन करणार नाही. या पार्श्वभूमीवर आज परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले.१० मे रोजी पाकिस्तान आणि भारताने शस्त्रविरामाची घोषणा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबर व्यापाराबाबात झालेल्या चर्चेनंतर शस्त्रविरामावर सहमती झाली असे ट्विट केले होते.परराष्ट्र मंत्रालयाने मात्र हा दावा आज फेटाळला आहे. दोन्ही देशांमधील शस्त्रविरामाचा निर्णय हा सैन्याच्या कारवाईनंतर घेण्यात आला अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.  
 
काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी चालणार नाही- रणधीर जयस्वाल
 
जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवावा, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.परराष्ट्र मंत्रालयाची ही दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका आहे आणि आमच्या या धोरणात काहीही बदल झालेला नाही असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग रिकामी करावा हा प्रलंबित मुद्दा आहे”, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
 
पाकिस्तानच्या चौका जमीनदोस्त
 
पाकिस्तानच्या १०-१२ सैनिकांना भारतीय सैनिकांकडून कंठस्थान दिले गेले. एलओसीवरील पाकिस्तानच्या चौका जमीनदोस्त करण्यात भारतीय लष्कराला यश आले.एलओसीवर १५-२० दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. यावेळी सिंधू करार स्थगितीमध्ये तूर्तास काहीही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Related Articles