E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
13 May 2025
बढाईखोर माणूस
एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
तात्पर्य : आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.
---
यशाची खरी किंमत त्यात गमावलेल्या गोष्टीत असते, कारण प्रत्येक यशाला काही न काही किमत चुकवली असते. यश मिळवण्यासाठी आपल्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल घडवावे लागतात - काही वेळा वेळ, काही वेळा ऊर्जा, कधी कधी नातेसंबंध आणि कधी कधी स्वतःसाठी घालवलेला व्यक्तीगत वेळ.
जेव्हा आपण यशाकडे जातो, तेव्हा आपल्याला किती गोष्टी त्यागाव्या लागतात, हे आपल्याला समजून येतं. हे त्याग, गमावलेली गोष्टी किंवा त्यात दिलेला कष्टांचा परिष्कारच आपल्याला खरे यश प्राप्त करायला मदत करतो.
यश मिळवण्यासाठी ज्या गोष्टी गमावल्या, त्या गोष्टी आपल्याला अजून अधिक समृद्ध बनवतात. जरी आपण यश प्राप्त केलं तरी, त्यातल्या गमावलेल्या गोष्टींचं मोल लक्षात घेतल्याने आपल्या यशाची खरी शुद्धता समजते.
खरं तर, यश त्यागाची प्रक्रिया असते - ज्यामुळे आपल्याला अधिक शहाणं, अनुभव घेणं आणि अधिक सुसंस्कृत बनवते. यश मिळवताना आपण काय गमावलं आहे हे तपासलं की, ते एक ठराविक मार्ग आणि शहाणपण देतं, जे आपल्याला त्या यशाच्या मागे दडलेली गोडी समजायला मदत करतं.
---
एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली. काळा ढग पाण्याने जड झाला होता. तो हळूहळू जमिनीकडे उतरत येत होता. गोरा ढग अगदी हलका होता. तो उंच आभाळात चढत होता. भेट झाल्यावर गोर्या ढगाने काळ्याला विचारले, कुठे चाललास? काळा ढग म्हणाला, जमिनीकडे. मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे. माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे.
जमीन उन्हाने तापली आहे. नद्या, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. झाडेपण सुकून गेली आहेत. शेतकरी आतुरतेने माझी वाट पहात आहेत. मला जरा घाईने गेले पाहिजे. गोरा ढग त्याला हसला. त्याला म्हणाला, वेडाच आहेस. आपली संपत्ती कधी अशी कोणी जगावर उधळून देतो का? तुझ्यातले पाणी संपले की तुझे आयुष्यच संपले की! मी चाललोय स्वर्गात. देव बाप्पाच्या घरी एक जागा रिकामी झालीय. ती मला मिळेल.
गोर्या ढगाला खूप घाई होती. तो धावतच पुढे निघाला, काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला. मुसळधार पाऊस झाला. काळा ढग अदृश्यच झाला. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले तलाव विहिरी काठोकाठ भरले. सारे रान हिरवेगार झाले. शेतकरी सुखावले.
गोरा ढग वर जाताना ते पहात होता. काळ्या ढगाच्या वेडेपणाला तो हसला. पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला. गोर्या ढगाने दार ठोठावले. एका देवदूताने ते उघडले. त्याने गोर्या ढगाला विचारले, तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे? गोरा ढग आपल्याच तोर्यात होता. तो म्हणाला, मी इथे रहायलाच आलोय, स्वर्गात एक जागा रिकामी झालीय. ती मलाच मिळणार! उघड दरवाजा. दार उघडायच्या ऐवजी देवदूताने ते लावूनच घेतले. लावता लावता तो म्हणाला, ती रिकामी जागा आता भरलीय. देवबाप्पा स्वतः विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले. ज्याने आपले सर्वस्व देऊन पृथ्वीवर आनंदी आनंद निर्माण केला, त्याच्यापेक्षा आणखी चांगली व्यक्ती कोण असणार?
तात्पर्य : समाजासाठी सर्वस्व समर्पण करणे हाच मोक्ष आहे. आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुखी करणे, त्यांना काही न काही मदत करणे यातूनच माणूस सुखी समाधानी होऊ शकतो.
--
शाळा : शाळेत उशिरा आले की शेवटच्या बाकावर बसावे लागते.
कॉलेज : कॉलेजमध्ये उशिरा आले की पहिल्या बाकावर बसावे लागते.
Related
Articles
जनसंख्येची मोजदाद (अग्रलेख)
06 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
सात्विक-चिरागचा पराभव
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
जनसंख्येची मोजदाद (अग्रलेख)
06 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
सात्विक-चिरागचा पराभव
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
जनसंख्येची मोजदाद (अग्रलेख)
06 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
सात्विक-चिरागचा पराभव
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
जनसंख्येची मोजदाद (अग्रलेख)
06 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
सात्विक-चिरागचा पराभव
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?