युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बजार   

अंतरा देशपांडे

antara@kalyanicapital.com

अनिश्चितता आणि चंचलता याचे आणि शेअर बाजाराचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत. ते बाजाराचे गुणधर्मच आहेत जणू. मागच्या महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आणि भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हे नक्कीच स्पष्ट झालेले दिसते. युद्ध किंवा आर्थिक संकटाच्या येऊ शकते या कल्पनेने ते दिशा बदलतात. किंचीतशीही सकारात्मक बातमी येताच ते पुन्हा वाढू लागतात. आता अशा अस्थिरतेमध्ये गुंतवणूकदाराने काय करावे?
 
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. कादाचित आता तो कमी होईल. पण तणाव वाढत असताना  गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून बाहेर पडायचे की, त्यांची स्थिती टिकवून ठेवायची? असा प्रश्न नेहमी पडतो. सीमेपलीकडून होणारे क्षेपणास्त्र हल्ले आणि लष्करी संघर्ष यासारख्या अलीकडील घडामोडींमुळे भू-राजकीय धोके वाढले आहेत.हे चित्र जरी असले तरी आत्तापर्यंतचा इतिहास असे सांगतो, की बाजार सध्य परिस्थितीत जरी खूप अनियंत्रित वागला, चढ-उतार अधिक झाले तरी दीर्घकालीन बघता नेहमीच चांगला परतावा दिला आहे.
 
२२ एप्रिल २०२५ च्या हल्ल्यानंतर काहीतरी घडामोडी होणार हे थोड्याफार प्रमाणात अपेक्षित होतेच. त्या अनुषंगाने ह्या तणावामुळे रुपयावर आधीच परिणाम झाला आहे आणि परदेशी गुंतवणूकदार अधिक सावध झाले आहेत. त्याच वेळी, संरक्षण आणि पायाभूत सुविधांचे साठे वाढले आहेत, कारण लोकांना सरकारकडून सुरक्षा आणि तयारीवर अधिक खर्च करण्याची अपेक्षा आहे.
 
भारताची सध्याची आर्थिक आणि संरक्षण स्थिती बघता दोन्ही देशांमधील संघर्ष वेळीच आटोक्यात आला तर बाजार नक्कीच स्थिरावेल. या संघर्षांमुळे भारताच्या दीर्घकालीन कथेला क्वचितच अडथळा निर्माण होईल आणि त्यामुळे केवळ अल्पकालीन चढउतार दिसून येतील असे वाटते. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करत राहणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी घाबरून पॅनिक सेलिंग करू नये आणि अश्या वेळेस डखझ किंवा डढझ द्वारे गुंतवणूक करणे जास्त योग्य असते कारण बाजार जो मुळातच अस्थिर आहे तो युद्धाच्या काळात अधिक अस्थिर होणे स्वाभाविक आहे.
 
दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याऐवजी आशादायक स्टॉक आणि क्षेत्रांची वॉचलिस्ट तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण मॅक्रो-इकॉनॉमिक घटक, मुख्य उत्पन्न कामगिरी आणि जीडीपी हे बाजारासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मोठे ट्रिगर आहेत.  मजबूत वाढीची क्षमता असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल.
 
ज्या गुंतवणूकदारांना वेळेअभावी किंवा सखोल अभ्यास करणे शक्य नाही त्यांनी मुच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय योग्य आहे. म्युच्युअल फंड हे तुलनेने सुरक्षित गुंतवणूक आहेत. कारण ते विविध स्टॉक, क्षेत्रे आणि मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे जोखीम विविध क्षेत्रात विभागली जाते. म्युच्युअल फंडांचे गुंतवणूकदार सामान्यतः स्टॉक गुंतवणूकदारांच्या तुलनेत कमी प्रतिकूल परिस्थितीत असतात.
 
ऐतिहासिकदृष्ट्या, भारताच्या भांडवली बाजारांनी लष्करी संघर्षांदरम्यान अल्पकालीन अस्थिरता दर्शविली आहे; परंतु कालांतराने ते पुन्हा मजबूत झाले आहेत. आकडेवारी आणि बाजारातील वर्तन असे सूचित करते की शांत, शिस्तबद्ध दृष्टिकोन अनेकदा आवेगपूर्ण निर्णय घेण्यापेक्षा चांगले काम करतो.

खाली काही प्रमुख उदाहरणे दिली आहेत :

या सगळ्याचा सारांश - काय करावे?

१. एसआयपी सुरू ठेवा
२. टॉप-अप एसआयपी
३. टप्प्याटप्प्याने एकरकमी गुंतवणूक
४. गरज पडल्यास पुनर्संतुलन करा (घाबरून विक्री करू नका)

काय करू नये?

१. पॅनिक सेलिंग टाळा
२. एसआयपी थांबवू नका
३. अफवांवर विश्वास ठेऊन तडकाफडकी निर्णय घेऊ नका. 

भूतकाळातील संघर्षांभोवती निफ्टी ५० परतावा

घटना   १ महिना आधी संघर्षादरम्यान १ वर्षानंतर
कारगिल युद्ध (१९९९) -८.३०% ३६.६०% २९.४०%
उरी सर्जिकल स्ट्राइक (२०१६) -०.३०% ०.४०% ११.३०%
बालाकोट एअर स्ट्राइक (२०१९) ०.८०% -०.४०% ८.९०%

 

Related Articles