लाहोर : भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी जिओ न्यूजला शनिवारी सांगितले की, सध्या अणु कार्डचा पर्याय उपलब्ध नाही. तथापि, जर तशी परिस्थिती निर्माण तर ’निरीक्षकांवर’ देखील परिणाम होईल. लष्करी संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांच्या लष्करी संस्थांवर हल्ले करत आहे. संघर्ष परिसरापुरता मर्यादित राहणार नाही. त्याचा विस्तार अधिक नाशास कारणीभूत ठरणार आहे. नॅशनल कमांड अॅॅथोरिटीचीची बैठक बोलावलेली नाही. अॅथोरिटी अण्वस्त्राचा वापर करायचा की नाही, याचा निर्णय घेते, असे असिफ म्हणाले.
Fans
Followers