जगा आणि जगू द्या..   

अश्रू ढाळत मेहबूबा मुफ्तींचे दोन्ही देशांना आवाहन  

श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असून, दुर्दैवाने तो सीमेच्या दोन्ही बाजूंच्या निष्पाप लोकांचे जीव घेत आहे. या कठीण काळात संयम आवश्यक आहे. लष्करी हस्तक्षेपापेक्षा राजकीय हस्तक्षेपाची आता गरज आहे, असे सांगतानाच पीडीपीच्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती भावूक झाल्या. जगा आणि जगू द्या.., असे आवाहन त्यांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना केले. 
 
मुफ्ती म्हणाल्या, दोन्ही देशांतील युद्धामुळे सीमेवरील दोन्ही बाजूचे नागरिक बेघर होत आहेत. पुलवामा असो किंवा पहलगाम, दोन्ही घटनांनी आपल्याला धोक्याच्या उंबरठ्यावर आणले आहे. यावर उपाय काढणे गरजेचे आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी आणि लष्करी कमांडरनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकत्र येऊन शांततापूर्ण तोडगा काढणे, तसेच जीवित आणि मालमत्तेचे आणखी नुकसान टाळणे महत्त्वाचे आहे. निष्पाप नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे. 

Related Articles