दहशतवाद्यांचा तळ त्यांची स्मशानभूमी बनला   

नवी दिल्ली : भारताला डिवचले तर काय होईल, हे पाकिस्तानी नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. आता भारताच्या शूर सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांना त्यांची स्मशानभूमी बनवली, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. 
 
नक्वी म्हणाले, पहलगाममध्ये पतीची हत्या करून आमच्या बहिणींचे कुंकू पुसणार्‍या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांसह पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे. देश आर्थिक संकटात असताना पाकिस्तानी नेत्यांनी दहशतवादाला पाकिस्तानचा राष्ट्रीय उद्योग बनवून स्वत:ची कबर खोदली आहे. भारताला हात लावण्याचे धाडस केले तर मोदी त्यांना सोडणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. भारताला धोका देणारी प्रत्येक जागा आणि व्यक्ती धूळ खात पडेल. भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन न करता हल्ले केले. 

Related Articles