E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; १०० अतिरेकी मारल्याचा दावा
Samruddhi Dhayagude
08 May 2025
नवी दिल्ली : भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या मोहिमेची माहिती बुधवारी दिली. 'ऑपरेशन सिंदूर' संपलेले नसून जर पाकिस्तानने आगळीक केली, तर भारताकडून पुन्हा असेच उत्तर दिले जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याचीही माहिती त्यांनी दिली. 'ऑपरेशन सिंदूर' सुरू असल्यामुळे मृतांचा नेमका आकडा देण्यात आलेला नाही.
१०० अतिरेकी मारले गेले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देताना म्हटले की, या हवाई हल्ल्यांत सुमारे १०० अतिरेकी मारले गेले आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मोहीम संवेदनशील असल्यामुळे या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून सविस्तर माहिती दिलेली नाही.
राजनाथ सिंह या बैठकीत म्हणाले की, भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनीही बैठकीला हजेरी लावली होती.
तत्पूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कारवाईला आपले समर्थन दिले. तसेच ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर सर्व पक्षीय बैठक बोलावून सर्व विरोधकांना विश्वासात घेतल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित
पंतप्रधान मोदी या बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दलचा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला. ते म्हणाले,''पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या पहिल्या बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित नव्हते. जर ते स्वतःला संसदेपेक्षा वरचढ समजत असतील तर काही हरकत नाही. याबद्दल त्यांना नंतर विचारणा करू. पण या संकटाच्या काळात आम्ही कुणावरही टीका करू इच्छित नाही.''
सर्व पक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारतर्फे माध्यमांना निवेदन देताना म्हटले की,''सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडली. सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवत कोणतीही टीका-टिप्पणी केली नाही. ही बैठक एका व्यापक राजकीय हेतून घेतली गेली होती, जिचा उद्देश सफल झाला आहे.''
Related
Articles
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात
06 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात
06 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात
06 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात
06 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर