ढेकळांचे पंचनामे करायचे का?   

कोकाटे यांचा अजब सवाल

नाशिक : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ज्या शेतात काहीच नाही, तिथे ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल कोकाटे यांनी केला.घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा आणि अन्य जी पिके असतील, त्यांचे रीतसर पंचनामे केले जातील, असे त्यांनी सांगितले.
 
अवकाळी पावसामुळे राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात शेतातून काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या दोन प्रकारच्या कांद्याचाही समावेश आहे. शासकीय यंत्रणा उभ्या पिकाचे पंचनामे करीत असल्याच्या तक्रारींवर कोकाटे यांनी भाष्य केले.मुसळधार पावसात सिन्नर बस स्थानकाच्या छताचा काही भाग कोसळला होता. त्याची पाहणी कोकाटे यांनी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Articles