रायपूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर उडालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या. काही परिसरात गेल्या महिन्यांपासून नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. त्या अंतर्गत सोमवारी त्या चकमकीत ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली. छत्तीसगढ आणि तेलंगणा सीमेवर कारेगुट्टा पर्वतीय भागातील जंगलात चकमक उडाली होती, असे सांगताना बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी, सुंदरराजन म्हणाले, २१ एप्रिलपासून सुमारे २४ हजार जवान कारवाई करत आहेत. घटनास्थळी नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि ३०३ रायफली सापडल्या आहेत. ते म्हणाले २४ एप्रिल रोजी चकमकीत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या.
Fans
Followers