E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीला पावसाचा फटका
Samruddhi Dhayagude
02 May 2025
तीन मुलांसह चौघांचा बळी
नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांना शुक्रवारी मुसळधार पावसाचा फटका बसला. दिल्लीत महिला आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील बळींची एकूण संख्या चार झाली. पावसामुळे दिल्लीकडे येणारी तीन विमाने जयपूर, अहमदाबादकडे वळविण्यात आली. २०० हून अधिक विमानांचे वेळापत्रक कोलमडले. उत्तर प्रदेशाला पावसाने दणका दिला. वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाला.
दिल्लीतील मिंटो पूल आणि आयटीओसह अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली. त्यामुळे मार्गावर व अन्य ठिकणी वाहतूक कोंडी झाली. शहरात तीन तासांत ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसास सुरुवात झाली होती. सुमारे २५ झाडे उन्मळून पडली आणि रस्ते जलमय झाल्याने नागरिक अडकून पडले. सुमारे १२ ठिकाणी पाण्याची तळी साचल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. मिंटो मार्गावर जलमय झाला होता. त्यात अनेक वाहने अर्धी पाण्यात तरंगत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमावर फिरल्या. तसेच झाडे उन्मळून पडल्याची आणि नागरिक पाण्यात अडकल्याच्या दृश्यांचा त्यात समावेश होता. आर. के पूरम येथील सोमनाथ मार्ग, मिंटो रस्ता आणि खानपूर परिसराला पावसाचा फटका बसला. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. महिला आणि तीन मुलांचा मृत्यू जोरदार वार्यामुळे झाड अंगावर कोसळून झाला आहे. नसिफगंज भागातील खाकरी नहर गावात घर कोसळले होते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी बचाव पथक धावले आणि त्यांनी तेथून चौघांची सुटका केली. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली.
उत्तर प्रदेशात वीज पडून चौघांचा मृत्यू
उत्तर भारतात दिल्ली एनसीआर, गुरुग्राम, फरिदाबाद आणि मथुरेत जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहतूक मंदगतीने सुरू होती. उत्तर प्रदेशात पावसाचे चार बळी गेले आहेत. त्यापैकी तिघांचा वीज पडून मृत्यू झाला. एक घटना इटाह जिल्ह्यातील भगवंतपूरची असून दुसरी फिरोजाबाद जिल्ह्यातील आहे. दुर्घटनेत काही जण जखमी झाले.
Related
Articles
गवई घटनात्मक मूल्ये राखण्यास सक्षम
15 May 2025
राजस्तानमध्ये ‘ब्लॅकआउट’
13 May 2025
वाचक लिहितात
19 May 2025
एलओसीवर १५-२० दहशदवाद्यांचा खात्मा : परराष्ट्र मंत्रालय
13 May 2025
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट
13 May 2025
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल
18 May 2025
गवई घटनात्मक मूल्ये राखण्यास सक्षम
15 May 2025
राजस्तानमध्ये ‘ब्लॅकआउट’
13 May 2025
वाचक लिहितात
19 May 2025
एलओसीवर १५-२० दहशदवाद्यांचा खात्मा : परराष्ट्र मंत्रालय
13 May 2025
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट
13 May 2025
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल
18 May 2025
गवई घटनात्मक मूल्ये राखण्यास सक्षम
15 May 2025
राजस्तानमध्ये ‘ब्लॅकआउट’
13 May 2025
वाचक लिहितात
19 May 2025
एलओसीवर १५-२० दहशदवाद्यांचा खात्मा : परराष्ट्र मंत्रालय
13 May 2025
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट
13 May 2025
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल
18 May 2025
गवई घटनात्मक मूल्ये राखण्यास सक्षम
15 May 2025
राजस्तानमध्ये ‘ब्लॅकआउट’
13 May 2025
वाचक लिहितात
19 May 2025
एलओसीवर १५-२० दहशदवाद्यांचा खात्मा : परराष्ट्र मंत्रालय
13 May 2025
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट
13 May 2025
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल
18 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
2
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
3
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
4
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
5
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार
6
कोण आहेत विक्रम मिस्री?