मी पळपुटा नाही...   

नवी दिल्ली : मी पळपूटा नाही. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना सांगून देश सोडला. मला चोर म्हणणे चुकीचे आहे. कारण ६,२०० कोटींच्या बदल्यात बँकांनी १४००० कोटी वसुल केले आहेत, असा दावा प्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.रॉयल चॅलेंजर बंगळुरूने (आरसीबी) पहिल्यांदाच आयपीएलचा चषक पटकावला. त्यामुळे मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 
 
हजारो कोटींचा बँक गैरव्यवहार करुन देशाबाहेर पळून गेलेल्या मल्ल्या याने लंडनमधून मायदेशी परतण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. भारतात निष्पक्ष खटला आणि सन्माननीय जीवनाची हमी मिळाली, तर मी मायदेशी परतण्यास तयार आहे, असेही त्याने म्हटले आहे.मल्ल्याने देशातील १७ बँकांकडून ६२०३ कोटींचे कर्ज घेतले. मात्र, बँकांनी त्यांच्या संपत्तीतून १४१३१.६ कोटी वसूल केले. म्हणजे मूळ कर्जाच्या दीडपटपेक्षा जास्त, असा दावाही केला.

Related Articles