दहशवादाविरोधात एकत्रित लढण्याची गरज : शशी थरूर   

न्यूयॉर्क : आम्ही मैत्रीचा हात पुढे केला, पण बदल्यात दहशतवादी हल्ले झाले. दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून, याला जागतिक पातळीवर एकत्रितपणे त्याला प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे मत न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात आयोजित पत्रकार परिषदेत शशी थरूर बोलत होते.
 
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला जागतिक पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेचा दौर्‍यावर आहे. या शिष्टमंडळाने न्यू यॉर्कमधील ९/११ स्मारकापासून आपला दौरा सुरू केला.

पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर 

शशी थरूर यांनी अमेरिकेच्या जनतेला आठवण करून दिली, की ज्याप्रमाणे अमेरिकेने ’ऑपरेशन नेपच्यून स्पियर’ अंतर्गत ओसामा बिन लादेनला मारले, त्याचप्रमाणे भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. लष्करी छावणीजवळ लपून बसलेल्या ओसामाला पाकिस्तानने आश्रय दिल्याचेही त्यांनी सांगितले.

’जोरात मारा, हुशारीने मारा’  

आम्ही आंतरराष्ट्रीय कागदपत्रे आणि पुरावे दिले पण पाकिस्तानने ते नाकारले. आता आम्ही स्पष्ट संदेश दिला आहे, की जर तुम्ही हल्ला केला, तर तुम्हाला अचूक आणि जोरदार प्रत्युत्तर मिळेल. या विधानाद्वारे भारत असे सूचित करत आहे, की आता दहशतवाद केवळ धोरणात्मक पातळीवरच नाही तर कृती पातळीवरही थांबवला जाईल, असे थरूर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
 

Related Articles