E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी उत्पादन अपेक्षित
Samruddhi Dhayagude
22 May 2025
खते आणि बियाण्यांचा पुरेसा साठा; बोगस बियाणे रोखणार
मुंबई,(प्रतिनिधी) : या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यानुसार, राज्याच्या विविध विभागांत ७ ते १७ टक्के जास्त पाऊस पडणार आहे. दोन वेळच्या पावसात जास्त खंड देखील नसेल. या वर्षीच्या खरीप हंगामात २०४ लाख मेट्रिक टन उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात विक्रमी असे उत्पादन होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.
शेतकर्यांना सहायभूत व्हावे, यासाठी सर्व शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे असणारे एआय आधारित ‘महाविस्तार अॅप’ हे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावर्षी बी-बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध बाहे. बोगस बियाण्यांना आळा घालण्यासाठी यावर्षीपासून सत्यप्रत बियाणे (ट्रुथफूल बियाणे) केंद्र सरकारच्या साथी पोर्टलवर नोंदवावे लागणार आहे. त्यामुळे बोगस बियाण्यांचा प्रश्नही सुटणार आहे. कर्ज देताना शेतकर्यांना सिबिलची सक्ती करणार्या बँकांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होतेयावर्षी राज्यात आवश्यक तेवढी बियाणे पुरवठा केंद्रे उपलब्ध आहेत. खतेही उपलब्ध आहेत. कोणताही तुटवडा पडणार नसल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, मागील वर्षाचा कल पाहता कोणते पीक कमी-अधिक प्रमाणात घेता येईल, याचा विचार करूनच बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे.
बोगस बियाणे रोखण्यासाठी केंद्राच्या साथी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. यामुळे बियाण्यांचे नेमके उत्पादन कुठे झाले, हे ट्रेस करता येते. या सत्यप्रत बियाण्यांना देखील आता केंद्राच्या साथी पोर्टलवर नोंदवावे लागणार आहे. केंद्राने इतर राज्यांना देखील हा नियम करायला सांगितले आहे.
प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर खत लिंकिंगच्या संदर्भात फलक लागणार आहे. तिथे तक्रारीचा नंबर असेल. पुरवठादार कंपन्यांनी लिकिंगची सक्ती केली तर त्यावर इसेन्शिअल कमोडिटी अॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आज आपण महाविस्तार अॅप लॉन्च केले आहे. त्यावर शेतीबाबत सगळी माहिती उपलब्ध असणार आहे. हे अॅप एआय आधारित असणार आहे. शेतीचे सर्व व्हिडिओ देखील त्यात उपलब्ध असतील. लागवडीपासून ते कीड व्यवस्थापन सर्व माहिती त्यात आहे. चॅटबॉट देखील त्यात आहे. शेतकर्याने कोणताही प्रश्न विचारला तर त्यात उत्तर मिळेल. हे अॅप शेतकर्याचा डिजिटल मित्र असून ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. लवकरच हा चॅटबॉट व्हॉट्सपवर देखील आणू. कोणत्या मार्केटमध्ये शेतमालाचे भाव काय आहेत, याची रिअलटाइम माहिती त्यात मिळू शकते, असेही ते म्हणाले.
शेतकर्यांचे 'सिबिल' मागाल तर कारवाई
शेतकर्यांना योग्य तो कर्जपुरवठा झाला पाहिजे, हे बँकांना सांगितले. जिल्हाधिकार्यांना देखील सांगितले आहे की, महत्त्वाच्या बँकांची बैठक घेउन योग्य तो कर्जपुरवठा झाला पाहिजे. शेतकर्यांकडे जर सिबिलची मागणी बँकेने केली तर त्या शाखेवर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. फलोत्पादन, नैसर्गिक बांबू लागवड आदीत वाढ करायची आहे. सुगंधित फुले, वनस्पती आदींबाबत कार्यक्रम आयोजित केले आहेत. शेतकर्यांना अनुदान, मदत आणि इतर फायद्यांचे वितरण सुलभ करणे हे योजनेचे उद्दिष्ट असून यासाठी कृषी विभागाने अर्ज निवड प्रक्रियेची ’प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ ही नवी पद्धत लागू केली आहे. या अंतर्गत वर्ष २०२५-२६ साठी प्रथमतः १,५१,३५२ शेतकर्यांची निवड झालेली असून त्यांना देण्यात येणारी अंदाजित देय अनुदान रक्कम ८३९.५५ कोटी आहे.
प्रत्येक तालुक्यात डिजिटल शेतीशाळा
यावर्षी चांगला हंगाम असणार आहे त्यामुळे कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कापसावर अळी, सोयाबीन, धानावर मावा तुडतुडा असे अनेक रोग पाहायला मिळाले. त्यामुळे कीड व्यवस्थापनासाठी चांगली काळजी घेण्यात येईल. शेतकर्यांसाठी डिजिटल शेतीशाळा प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात येतील. शेतकरी या माध्यमातून कीड व्यवस्थापनापासून ते सर्व प्रकारचे नवीन पद्धतीचे मार्गदर्शन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपत्तीचा आधीच इशारा; डिजिटल पंचनामे
हवामान विभागाच्या मदतीने अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्तींचा आधीच इशारा देण्यात येईल. आता सर्व पंचनामे आदी गोष्टी तंत्रज्ञानावर आधारितच होतील. ते आतापर्यंत डिजिटली उपलब्ध नव्हते. मात्र, आता त्यांची सत्यता पडताळता येणार आहे. विम्यामध्ये गैरव्यवहार झाले होते. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने या गोष्टी टाळता येतील, असेही फडणवीस म्हणाले.
Related
Articles
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या
06 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या
06 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या
06 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या
06 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?