डॉ. जयंत नारळीकर यांचा जीवनप्रवास...   

पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फौंडेशनने ८३ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपूर्द केला. त्याच्या व्याजातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लक्ष रुपयांचा निधी ग्रामीण व दुर्गम भागातील विविध साहित्यिक उपक्रमांसाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदे तर्फे घेण्यात आला होता. प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा निधी संमेलनाध्यक्षांना देण्यात येत होता. नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डॉ. जयंत नारळीकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना एक लक्ष रुपयांचा धनादेश दिला. तो तत्काळ मला परत देत डॉ. नारळीकर म्हणाले, ‘कोरोनाच्या संकट काळात कार्यक्रमांवर असलेल्या बंधनांमुळे तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास करून कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने हा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत करत आहे. तो निधी तुम्ही इतर साहित्यिक उपक्रमांसाठी वापरा. ग्रामीण भागातील संस्थांना ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगा. मी त्यासाठी जरूर उपस्थित राहीन’. अशा अनेक कार्यक्रमांना डॉ. नारळीकर उपस्थित राहिले होते.
 
- प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
 
१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे डॉ. नारळीकर यांचा जन्म  झाला.
१९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथमक्रमांक पटकावला.
उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. 
१९५९ मध्ये रँग्लर ही पदवी घेतली.
१९६० मध्ये खगोल विज्ञान विषयातील यशासाठी टायसन पदक मिळाले.
१९६३ मध्ये केंब्रिज विश्वविद्यालयातून पीएच. डी. प्राप्त केली. 
१९६६ मध्ये ते इन्स्स्टिट्यूट ऑफ थियोरेटिकल एस्ट्रोनॉमी केंब्रिज विश्वविद्यालयाचे संकाय सदस्य झाले. 
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) यांच्याशी झाला. 
१९७२ मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. 
१९७४ मध्ये भारतीय विज्ञान अकादमीचे सदस्य झाले.
१९७७ मध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय सदस्य झाले. 
१९७९ मध्ये विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे राष्ट्रीय व्याख्याता झाले.
१९८३ मध्ये रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, लंडनचे ते सदस्य झाले. 
१९८६ मध्ये राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे सन्माननीय सदस्य झाले. 
१९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
त्यांच्या ’यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (सन २०२१)
 
मिळालेले पुरस्कार...
१९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
२००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
२०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
२०१४ भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाला.
२०१४ ‘चार नगरातले माझे विश्व’ या पुस्तकाला साहित्य अकादमी प्राप्त 
२०१३ मध्ये तेनाली-हैदराबाद येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय.
२०१२ अमेरिकेतील फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार 
’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार
 
साहित्य संपदा
 
अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.
 
इतर विज्ञानविषयक पुस्तके
 
अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)

Related Articles