E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले
Samruddhi Dhayagude
12 May 2025
माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचे मत
पुणे : युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही, ना ती एखादी हिंदी चित्रपटाची कथा आहे. मृत्यू, निर्वासित समस्या आणि कुटुंबांचे विघटन, असे अदृश्य पण खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होते. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे. अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले. युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही. प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा. युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे, असे मत भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले.
’द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरवणे बोलत होते. एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव शाळेच्या शकुंतला शेट्टी आडिटोरियम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोर पंप प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई, माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, इन्स्टिट्यूट आफ कॉस्ट अकाउंटंट्स आफ इंडिया (आयसीएमए) माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे आदी यावेळी उपस्थित होते.
मनोज नरवणे म्हणाले, संरक्षणासाठी किती खर्च करावा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यांसाठी किती खर्च करावा हा वाद फार जुना आहे. संरक्षणातील खर्च ही उधळपट्टी नसून देशासाठी आवश्यक ‘इंश्योरेंस’ आहे. सज्ज लष्करामुळे संघर्ष टळतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. युद्ध महागडे असते त्याची नुकसान भरपाई खर्चिक असते. म्हणून ही गुंतवणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. युद्धानंतर भारतीय सैन्य नेहमीच शांततेकडे परतते आणि तसेच राहायला हवे. विशेषतः मातृदिनाच्या निमित्ताने हे सांगणे महत्त्वाचे आहे की कोणत्याही आईला आपले मुल युद्धात गमवावा लागू नये. आपण राष्ट्रीय सुरक्षेकडे बघताना बहुतांश वेळा ते केवळ लष्करी दृष्टिकोनातून पाहतो. तर आपापल्या क्षेत्रात काम करत असताना आपण सर्व जण देशाच्या सुरक्षेसाठी काही ना काही योगदान देतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Related
Articles
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?