E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
कटरा : जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या पुलासाठी सुमारे १,४८६ कोटींचा खर्च आला आहे. चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी अंजी नदीवरील देशातील पहिल्या केबल पुलाचेदेखील उद्घाटन केले.या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान मोदी हातामध्ये तिरंगा घेऊन काही पावले पुलावरुन चालले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या पुलामुळे कटरा ते श्रीनगर जोडले जाणार आहे. चिनाब नदीवरील हा पूल ३५९ मीटर उंचीचा आहे. या पुलाची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आही. काश्मीर खोर्याला देशाच्या अन्य भागाशी जोडणारा हा पूल वास्तुशिल्पाचे अद्भूत उदाहरण आहे. हा पूल १,३१५ किलोमीटर लांबीचा आहे. तो भूकंप आणि ताशी २६० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे सहन करु शकतो. या पुलावर एक पदपथ आणि एक सायकल मार्गही बनवण्यात आला आहे.
१९८३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जम्मू-उधमपूर-श्रीनगर रेल्वे मार्गाचा पाया रचला. त्यावेळी या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ५० कोटी होता. तो पाच वर्षांत केला जाणार होता. मात्र, १३ वर्षांत केळ ११ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग बांधता आला. ज्यामध्ये १९ बोगदे आणि ११ पूल यांचा समावेश होता. या प्रकल्पासाठी ३०० कोटी खर्च आला. उधमपूर-कटरा-बारामुल्ला या प्रकल्पासाठी एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजरात यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत (१९९६-९७) प्रयत्न सुरू झाले. बारामुल्ला येथे काम करण्याचे निश्चित झाले.
१९९७ मध्ये प्रत्यक्षात काम सुरु झाले. मात्र, त्यानंतरही कामकाजातील अडथळे आणि हवामानाचे आव्हान यामुळे या प्रकल्पाचा खर्च ४० हजार कोटींच्या घरात गेला. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला लोहमार्ग २७२ किमीचा आहे. या रेल्वे मार्गावर ३८ बोगदे आहेत, ज्यांची लांबी ११९ किमी आहे. रेल्वे मार्गावर ९४३ रेल्वे पूल आहेत. हा पूल -१० अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस पर्यंतचे तापमान सहन करू शकतो. या पुलाची क्षमता १२० वर्षांपर्यंत आहे. चिनाब पुलातील कटरा ते बनिहाल हा १११ किलोमीटरचा मार्ग महत्त्वाचा आहे. या कामास २००२ मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात कामास २०१७ मध्ये सुरुवात झाली. या ठिकाणी पोहोचण्यासाठी २६ किमी लांबीचा रस्ता आणि ४०० मीटर लांबीचा बोगदा बांधण्यात आला होता.
Related
Articles
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
आषाढी वारी आणि एकादशीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी
18 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !