जम्मू सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला , सात दहशतवादी ठार   

 

सीमा सुरक्षा दलाची कारवाई, चौकी नष्ट
 
नवी दिल्ली/ जम्मू : भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील जम्मूत घुसखोरीचा सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. त्या अंतर्गत सात दहशतवाद्यांचा खात्मा केला असून पाकिस्तानी चौकी नष्ट केली असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.
 
जम्मू सीमेवरील सांबा जिल्ह्यात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तदहशतवाद्यांचा एक मोठा गट घुसखोरी करत असल्याचे बीएसएफच्या पाहणी पथकाला दिसून आले. घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी सैनिक  धानापूर येथील चौकीतून गोळया झाडून संरक्षण देत होते. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी घुसखोरांना अचूक टिपले. एकूण सात दहशतादी ठार झाले असून धानापूर चौकीचे जवानांच्या हल्ल्यात नुकसान झाले  दरम्यान, सात हून अधिक दहशतवादी ठार झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलाने घुसखोरांना अचूक टिपले असल्याची अणि एक बंकर नष्ट करत झाल्याची थर्मल चित्रफीतही प्रसारीत केली याबाबातची एक पोस्टही समाज माध्यमांवर टाकली आहे. अवजड यांत्रिक बंदुकीचा वापर चौकीवर हल्ला करण्यासाठी केला होता.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवानांना सतर्क राहण्याचे आदेश अगोदरच दिले आहेत. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम पर्यटनस्थळावर हल्ला करुन एकूण २६ जणांचे बळी घेतले होते. 
 

Related Articles