E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
'ऑपरेशन सिंदूर'च्या प्रभावी संगीत आणि प्रतीकाची रंजक माहिती
Samruddhi Dhayagude
26 May 2025
नवी दिल्ली : एखादी मोहीम यशस्वीपणे कधी, कशी साकारायची याचे अत्यंत महत्वाचे उदाहरण म्हणजे भारताने पाकिस्तानसह जगाला दाखवून दिलेले 'ऑपरेशन सिंदूर'. पहलगाम सारख्या घटनेनंतर भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले भारत हा पूर्वीसारखा राहिलेला नाही, भारत बदलला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'ची सर्व पातळयांवरील प्रभावी अंमलबजावणी हेच त्याच्या यशाचे गमक आहे. या योजनेमुळे केवळ भारतीय सैन्य दलाची ताकदच जगासमोर आली नाही तर दहशतवाद विरोधी भारताचा कडवा प्रतिसाद आणि निर्धार जगासमोर आला. पाकिस्तानच्या क्रूरतेचा फाटलेल्या बुरख्याच्या आता पूर्णपणे चिंधड्या उडाल्या.
लष्कराचे हे शौर्य विविध समाज माध्यमांवरील पोस्ट, व्हिडीओद्वारे अत्यंत प्रभावीपणे पोहोचले. त्यात एक गीत आणि संगीत याचा अचूक वापर केलेला दिसतो. दिनकर यांच्या 'रश्मीरथी' काव्याच्या ओळींचे 'रॉक' शैलीतील सादरीकरण होते. हा मुख्य मुद्दा नागरिकांच्या काळजाला स्पर्श करणारा ठरला.
कुंकवाच्या सांडलेल्या करंड्याचा प्रतीकात्मक वापर
पहलगाम येथे आलेल्या महिला पर्यटकांचे कुंकू पुसले. या हल्ल्याचे प्रतीकात्मक छायाचित्र म्हणून कुंकवाच्या करंड्याचा वापर 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देताना केला. या हल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्याच दिवशी मध्यरात्री सैन्याने संबंधित कारवाईची माहिती दिली. ही माहिती देताना लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' असे लिहलेले एक छायाचित्र पोस्ट केले. या पोस्टमध्ये #pehalgamTerroristAttack justice is served, जय हिंद. असा मेसेज समाजमाध्यमवरील अधिकृत खात्यांवरून रात्री दोन वाजता पोस्ट केला.
कुंकवाच्या छायाचित्राचा प्रतीकात्मक वापर करून ऑपरेशन या शब्दांमधील प्रत्येक अक्षराला वेगळा इफेक्ट दिला आहे. त्या नंतर लष्कराच्या समाज माध्यमांवरील खात्यांवर प्रसारित केले.
'कृष्ण की चेतावनी' चा संदर्भ
लष्कराच्या काही सूत्रांनी सांगितले की, हे सर्व व्हिडीओ भारतीय लष्कराच्या 'ऍडिशनल डायरेक्टोरेट जनरल स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन' च्या समाज माध्यम विभागाने तयार केले होते. त्यासाठीची सर्व गाणी आणि पार्शवसंगीत खास आशयानुसर बदलण्यात आले होते. मात्र १२ मे रोजी 'डीजीएमओ' यांच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये विशेष काव्यपंक्तींचा वापर केला होता.
व्हिडिओच्या सुरुवातीला रामधारी सिंह दिनकर यांचे कविताकोश मधील अजरामर काव्य 'रश्मिरथी'तील 'कृष्ण की चेतावनी' या भागातील एक श्लोक सादर केला.'रश्मिरथी' या काव्यात दिनकर यांनी कर्णाचे जीवन विविध पातळ्यांवरील मांडले आहे. या काव्यपंक्ती सादरीकरणात वापरून भारताने पाकिस्तानला दिलेला एका प्रतिकात्मक संदेश होता. या व्हिडिओमध्ये 'रॉक' संगीत शैलीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्र, नौदल, शस्त्र प्रणाली, वायूदलाची संरक्षण प्रणाली अशा सामरिक क्षमतेच्या प्रतिमांबरोबर सादर केली गेली. त्याला उपशीर्षकांची साथ होती. या व्हिडीओ बरोबर मागे ऐकू येणाऱ्या हिंदी ओळींचा अर्थ असा होता,''जेव्हा माणसाच्या डोक्यावर विनाश घोंगावत असतो, तेव्हा सर्वात आधी त्याचा विवेक नष्ट होतो.. तू शहाणपणाचे शब्द ऐकले नाहीस, मैत्रीचे मोल ओळखले नाहीस... आता शेवटचा निर्धार जाहीर करतो.विनवणी नाही, युद्ध होईल ; जीवन असो किंवा मरण यश त्याचेच होईल. ''
या संपूर्ण व्हिडीओ दरम्यान prepared, each move detected, 'every step watch' असे शब्द लिहले होते.
शिवतांडव स्तोत्राचा वापर
भारतीय प्रतीके, प्रतिमा यांच्या वापरासोबत ११ मे रोजीच्या पत्रकार परिषदेपूर्वी 'शिवतांडव' स्तोत्र ऐकवण्यात आले. त्यातून या संपूर्ण कारवाईची परिणामकारकता आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न केला गेला. सैन्यदलाकडून शेअर केलेली छायाचित्रे, व्हिडीओ यामध्ये वीर रसातील संगीताचा जाणीवपूर्वक वापर केल्याचेही लष्करातील सूत्रांनी सांगितले.
लष्करातील अंतर्गत विभागाचे यश
दिनकर यांचे संपूर्ण काव्य हे रॉक संगीत शैलीत प्रस्तुत केले गेले. त्यासाठीचे गाणे उपलब्ध तंत्रज्ञानाच्या साह्याने लष्करातील अंतर्गत विभागानेच तयार केले. भारताने नष्ट केलेले दहशतवादी तळ, लष्करी तळ, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील स्थितीची छायाचित्र, व्हिडीओचे कोलाज करण्यात आले. त्या दृश्यांसाठी पार्श्वसंगीत वापरून अधिक प्रभावी करण्यात आले. लष्कराने तीन दिवसांत लष्करी कारवाईचे व्हिडीओ प्रसिद्ध केले. भारतीय लष्कर सज्ज आहे, तयार आहे आणि भारताच्या शत्रू विरुद्ध निर्णायक ताकद वापरण्याची क्षमता, आमच्याकडे आहे. हेच या संगीत आणि व्हिडिओमधून पोहोचवण्यात आले.
देशातील नागरिकांचा लष्करावरील विश्वास आणखी दृढ व्हावा आणि सैन्य दलाच्या सामर्थ्यांची कल्पना संपूर्ण जगाला यावी, हा देखील त्यामागे एक उद्देश्य होता.
Related
Articles
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
शिव वर्मा यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
20 Jun 2025
राज्यात कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण
19 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
शिव वर्मा यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
20 Jun 2025
राज्यात कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण
19 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
शिव वर्मा यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
20 Jun 2025
राज्यात कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण
19 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
शिव वर्मा यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
20 Jun 2025
राज्यात कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला