थकीत शुल्कामुळे विद्यार्थिंनी शाळे बाहेर   

येरवडा : विध्यार्थीनी फी भरली नसल्याने त्यांना शाळेच्या बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार बुधवारी येरवडा येथील एका विद्यालयात घडला. याचा विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विद्यालया समोर आंदोलन करण्यात आले.               
 
शैक्षणिक वर्ष २०२५ - २६  सुरु होऊन नऊ दिवस झाले. विद्यालयाकडून फी ची मागणी पहिल्या दिवसा पासून सुरु करण्यात आली. साधारण ४० विध्यार्थीना फी भरली नसल्याने वर्गात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अशा विध्यार्थीना मुख्यध्यापकांच्या कार्यालया बाहेर खाली बसून ठेवण्यात येत होते. पण काही विध्यार्थीना शाळा सुरु झाल्यावर घरी पाठवून देण्यात आले. ही माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  शाळे समोर आंदोलन केले.या दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक, पालक आणि  पदाधिकारी यांचीशी चर्चा करण्यात आली. फी संदर्भात शाळा प्रशासने पालकांन बरोबर समुपदेशनाने मार्ग काढावा असे आनंद गोयल यांच्या कडून सुचविण्यात आले  तसेच सहा जणांची कमिटी स्थापन करा यामध्ये एक संचालक मंडळातील सदस्य, दोन शाळा प्रशासनाचे अधिकारी, तसेच पालक संघांचे प्रतिनिधी घेत कमिटी तयार करा यांच्या मार्फत फी संधर्भात निर्णय घेण्यात यावा तसेच एखादा आर्थिक दुर्मिळ विध्यार्थी असल्यास मदत करण्याचे आश्वसन गोयल यांनी दिले. 
 
यावेळी शाळेचे मुख्याध्यापकाकडूनही सकारात्मक प्रतिसाद देत विध्यार्थीचे पुन्हा शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे  सांगण्यात आले.यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक आनंद गोयल, धनंजय बाराथे, सुहास कांबळे, सनी पवार, किसन दर्बी, इलीयास शेख, पप्पू चव्हाण, संतोष शेळके आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related Articles