पास्वान यांचा पक्ष सर्व जागा लढणार   

बिहार विधानसभा निवडणूक

आरा, (बिहार) : माझी युती फक्त बिहारच्या जनतेशी असून, आपला पक्ष विधानसभेच्या सर्व २४३ जागा लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री चिराग पास्वान यांनी रविवारी येथे केली. पण, त्याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठे यश मिळावे, यासाठी माझा पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही चिराग म्हणाले.
 
भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे आयोजित सभेत चिराग यांच्या जनशक्ती पक्षाने (रामविलास) एकप्रकारे काल निवडणुकीचा बिगुल वाजवला.बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. चिराग यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवायची हे बिहारची जनताच ठरवेल, असे चिराग यावेळी म्हणाले. 
मी रामविलास पास्वान यांचा मुलगा असून त्यांचे स्वप्न साकारेन. मी जेव्हा-जेव्हा राजकीय निर्णय घेतो, तेव्हा तो राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी घेतो, असेही चिराग म्हणाले. 
 

Related Articles